Wednesday, November 4, 2009

पाणी वाचवा ! पण कोणी ?

पाणी वाचवा ! पण कोणी ?

नागपूर, सुरत किंवा नाशिक कुठल्याही गेस्ट हाउस किंवा हॉटेल मधला माझा अनुभव असा आहे कि नळाला गरम पाणी येत नाही असे reception ला सांगितले कि दोन बादल्या जाऊ देत मग गरमा-गरम पाणी येईल असे सांगितले जाते. दोन बादल्या जाऊ देत म्हणजे काय ? आणि किती वेळा ?

शताब्दी / राजधानी अशा तत्सम ट्रेन्स मध्ये १ लिटर पाणी प्रवाश्यांना फुकट दिले जाते. कमी अंतर प्रवास करणारे बरेचसे प्रवासी अर्धी बाटली पाणी वापरतात आणि उरलेली तशीच ठेऊन जातात. मी attendant ला या सोडून गेलेल्या बाटल्यान्बद्दल विचारले तर या सगळ्या बाटल्या कचऱ्यात जातात असे मला कळले. मुंबई - सुरत शताब्दी रोज २ वेळा धावते, राजधानी हि २ वेळा, भारत भर अशा किमान ५० कमी अंतराच्या गाड्या धावतात आणि त्यातून अंदाजे २००० प्रवासी प्रवास करतात असे मानले आणि प्रत्येकी अर्धा लिटर पाणी वाया जाते असे धरले तर वर्षाकाठी साधारण १ कोटी ऐंशी लाख लिटर पाणी वाया जाते. माझ्याकडे गाड्यांचे आणि प्रवाश्यांचे खरे आकडे नाहीत, ते पहिले तर माझी खात्री आहे कि हा आकडा किमान ५ कोटी लिटर च्या वर जाईल. जे मला कळू शकते ते रेल्वेमधील अधिकार्यांना कसे कळत नाही. १ लिटर च्या ऐवजी अर्धा लिटरच्या बाटल्या वापरल्या तर कित्येक लिटर पाणी वाचू शकते हे त्यांना कसे कळत नाही.

Toilet मध्ये flush च्या वापरण्याने flush च्या आकाराप्रमाणे ५/८ लिटर पाणी वापरले जाते. एवढ्या पाण्याची खरच गरज आहे का ? मी माझ्या घरात गेली ४ वर्षे flush वापरलेला नाही. साधारण २/३ लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित काम होते. एक घरटी सरासरी ४ माणसे आणि दिवसाला flush ४ वेळा वापरतात असे गृहीत धरू. flush न वापरल्यास दिवसाला किमान १० लिटर पाणी वाचेल आणि वर्षाला ३६५० लिटर. एका सोसायटी मध्ये १५ कुटुंबे असतील तर ती वर्षाकाठी ५४७५० लिटर पाणी वाचते. विचार करा फ़क़्त flush न वापरल्याने मुंबई / ठाण्यामध्ये केवढी पाण्याची बचत होऊ शकते.

माझ्या एका नातेवाईकाकडे मी गेले १ वर्षाहून जास्त काळ पाहतोय कि त्यांचा नळ खराब आहे आणि त्यांनी तो अजूनही दुरुस्त करण्याची तसदी घेतलेली नाही. अमाप पाणी त्यांच्याकडे वाया जाते बहुधा या पाणी गळतीमुळे त्यांच्या सोसायटीची टाकी कधीच पूर्ण भरत नसेल याची मला खात्री आहे. पण ते बुजुर्ग आणि ज्ञानी असल्याने त्यांना मी सांगितले तर ते नक्कीच माझे म्हणणे हसण्यावारी नेतील. अशा वेळी स्थानिक सरकारी खात्याने घरोघरी जाऊन धाडी घालून जिथे पाणी गळती आहे तिथे लोकांना पकडून तातडीने दंड केला पाहिजे. हवे तर आधी ३/४ महिन्याचा कालावधी लोकांना स्वत:हून पाणी गळती थांबविण्याची संधी द्या पण नंतर ढुंगणावर फटके दिले पाहिजेत. आपण लोकशाहीस नालायक आहोत, जो पर्यंत ढुंगणावर वळ उठत नाहीत तो पर्यंत आपण कोणाला जुमानत नाही.स्वयंशिस्त हा प्रकारच अस्तित्वात नाही.

पाण्यावाचून लोक बेघर होत आहेत, आत्महत्या करत आहेत, आपल्याला काय अधिकार आहे पाण्याची अशी नासाडी करायचा ? पाण्याचे बिल भरण्याची क्षमता, आपल्याला त्याचा हवा तसा दुरुपयोग करण्याचा अधिकार नक्कीच देत नाही असे माझे ठाम मत आहे. या पाण्याच्या गैरवापरावर कोणाचेच लक्ष नाही कि सरकारचा अंकुश नाही.

माझ्या अनुभवावरून मला वाटते कि १२ महिने पाऊस पडला तरी आपल्याकडे पाण्याची कपात करावी लागेल. आपण वेळीच जागे झालो नाही तर भविष्य भीषण आहे.

- राजन महाजन

9 comments:

  1. sundar 'Everybody must follow.......i m trying for it '

    ReplyDelete
  2. i agree, what u said is true...
    pan jashi sarkari responsibilty aahe tashi "janta" chi pan responsibilty aahech na....

    ReplyDelete
  3. exactly....lokshahit lok aplya hakkanbaddal jagruk asatat..jababdaryanbaddal nahi. Nahitar Traffic Signalchya ithe police ubha karayachi kadhi garaj lagali nasati ani ti manpower adhik constructive kamasathi vaparata ali asati.

    ReplyDelete
  4. Ekdum correct. I can still see people washing their cars daily when not needed. Still trying to explain them is like saying to the bull please come and hit me. The problem is you try not to waste water and the others in the building are not at all bothered! The amount of wastage is same. I think rationing of water should be done so that people will think 10000 times before wasting any.

    ReplyDelete
  5. nice one.. accepted sir.. we need to start from ourside.. rather than expecting others to change for sumthing good. very true..

    ReplyDelete
  6. Ekdam correct aahe Rajan. Purnapane sahamat.
    Loka jagruk nahiyet, pan ase aani yasarkhe lekh vaachun, 100 paiki 10 loka tari nakki vichar karun paani vaapartil.
    keep writting.

    I will forward this link to as many people as I can.

    ReplyDelete
  7. Really good.
    Thnaks for putting light on unobserved area.

    ReplyDelete
  8. ekdam barobar. tyachbarobar aapli sanskruti, rudhi, paramparechya navakhaliapan pani,veej,kiti nasto hahi vichar pratyekane karayala hava.holila pani,itar sananchya divshi lighting, loud speakers,etc.he sagla apan badlu shakto ka?

    ReplyDelete
  9. nicely written.

    will fwd to my frds list.

    ReplyDelete