Wednesday, January 13, 2010

ऐका हो ऐका !


ऐका हो ऐका !!
ऐका हो ऐका …ऐका हो ऐका … “आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, श्री . (अ)शोकरावजी चव्हाण, यांनी हुकुम जारी केलाय कि - जो कोणी वाहतुकीचे नियम मोडेल, त्याला आजपासून तिप्पट दंड केला जाईल ….हो …….”
“हे बरे झाले.” भगवान विष्णू दवंडी ऐकून म्हणाले. “रोज केवढा तो गोंगाट, हॉर्नचा आवाज , कोणीही कशीही , मनात येईल तशी गाडी चालवतो , थांबवतो , उभी करतो. आता अशा बेशिस्त चालकांना तिप्पट दंड केला कि काहीतरी सुधारणा होईल , काय मुनीवर ?”
नारद मुनी (गालातल्या गालात हसत ) , “ सुधारणा होईल ना. नक्की होईल पण ती पोलिसांच्या राहणीमानात.”
भगवान प्रश्नार्थक नजरेने महामुनिंकडे पाहतात .
नारद मुनी , “ भगवन, मागच्या महिन्यातील दवंडी आठवते का तुम्हाला ? मुख्यमंत्री (अ)शोकरावजी चव्हाण, यांनी जाहीर केले कि पोलिसांच्या राहणीमानात सुधार करणार , त्यांची जीवनशैली चांगली करण्याला प्राधान्य देणार.”
भगवन अजून confuse… “ महामुनी , नक्की काय म्हणायचेय तुम्हाला ?”
नारद मुनी ,” भगवन , पोलिसांचे राहणीमान सुधारण्यासाठी , त्यांची जीवन शैली चांगली करण्यासाठी द्रव्य लागते. ते आहे कुठे राज्याच्या तिजोरीत ? राज्याच्या तिजोरीत कित्येक वर्ष खडखडाट आहे ….सगळे उसनवारीवर चालू आहे ? परंतु दिलेला शब्द पाळायला नको का ? म्हणून (अ)शोकरावांनी हि शक्कल काढली.”
भगवन - “म्हणजे ?”
नारद मुनी ,“भगवन , दंड तिप्पट केला असे म्हणाले ते , वसूल करू असे कुठे म्हणाले ? अहो , १०० रुपये दंड होता. तो वसूल न करता तडजोड केली कि ५० रुपयात काम भागायचे दोघांचे. नियम मोडनार्याची ५० रुपयांची बचत आणि पोलिसाचा ५० रुपयांचा फायदा. पण आता महागाई किती वाढलीये. साखर , तुरडाळ, कांदा , भाज्या, सगळ्या जीवनावश्यक गोष्टी भयंकर महाग झाल्यात. त्यात पोलिसांचे पगार तुटपुंजे म्हणून त्यांनी आबा आणि (अ)शोकरावांकडे भुण-भुण लावली. त्यातून (अ)शोकरावांनी हि शक्कल काढली.”
“दंडच तिप्पट केला , आपसूकच नियम मोडल्यावर होणार्या तडजोड रक्कमेत वाढ झाली. ५० रुपयांची कमाई तिप्पट होऊन १५० झाली. पोलिसांची कमाई वाढली कि त्यांचे राहणीमान आपोआप वाढणार आणि जीवनशैलीही सुधारणार आणि ते हि या सर्व खर्चाचा बोजा सरकारी तिजोरीवर न पडता.”
भगवन – “आयला !! (जीभ चावत)….वा !! काय डोके आहे या (अ)शोकरावांचे !!”
- राजन महाजन
१४ जानेवारी २०१०

Tuesday, January 12, 2010

दे धक्का


Click on the image for bigger view

१४ ऑगस्ट २००८

Wednesday, January 6, 2010

K(y)a साब !!

K(y)a साब !!
“आईला, हे कसाब हुशार निघालं रे !” हेंड Constable डोईफोडे हातातला paper खाली ठेवून म्हणाले. “का हो ?” पलीकडून Constable मान्यांनी विचारणा केली.

“अरे …हुश्शार म्हणजे लईच हुश्शार आहे हा कसाब. बाकीच्या ९ अतिरेक्यांप्रमाणे मेला नाही, स्वत:ला गोळी घालून घेणे सहज शक्य होते कि ? मग का नाही घातली ? का नाही अल्लाला प्यारा झाला ?” Head Constable डोईफोडे.

“का नाही झाला ?” माने विचारतात.

HC डोईफोडे - "त्याने भारताच्या न्यायव्यवस्थेचा आणि राजकारणाचा बरोबर अभ्यास केला असणार, १०१ टक्के सांगतो. जिंदा राहिला आणि आता मजा करतोय सरकारी पाहुण्यासारखा. त्याला पक्के ठाऊक कि पकडलो गेलो कि काही झाले तरी मरणार नाही आपण. भारताचे पोलीस आपली जंक्शन काळजी घेणार.

Constable माने - “आणि तसेच होतेय कि …आता १ वर्ष होऊन गेलेय आणि हा कसाब राजासारखा राहतोय. ज्याला भर चौकात मारून टाकायला पाहिजे, त्याला काही होऊ नये म्हणून आपण त्याच्या पुढे – मागे धावतोय.”

HC डोईफोडे - "अरे किती चोचले पुरवायचे ह्याचे. ह्याला वकील द्या. जेलमध्ये वेगळा सेल द्या. बिर्याणी खावीशी वाटते म्हणून बिर्याणी द्या. आणि हे सगळे सरकारी खर्चातून. त्या जेलच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना त्याच्या security पायी जीणे नकोसे झालेय. त्यांचा रोजचा रस्ता बंद करून टाकलाय, त्यामुळे तिथे taxi, बस जात नाहीत. दुकाने, धंदा नाहीत म्हणून बंद आहेत. मजा आहे नाही, हा १५० लोकांना मारून मजेत राहतोय आणि हे आपले लोक काही चूक नसताना, मारून घेतायत.”

Constable माने - "मला एक मान्य आहे कि आपल्या न्यायव्यवस्थेप्रमाणे त्याला खटला न चालवता आरोपी ठरवता येणार नाही , पण काही time चे limit आहे कि नाही ? एवढी clear केस आहे, मग महिन्यात निकाल लावून, फाशी देवून टाकायची, तर हे काय उद्योग चालू आहेत, काही कळत नाही."

HC डोईफोडे – "ह्या अतिरेक्याला प्रसिद्धी तरी किती ? रोज ह्याची एक तरी बातमी छापून येते. ह्याच्यावर कोणतरी picture पण काढणार आहे म्हणे. जेलमध्ये जाऊन एखादा पत्रकार " कसाबजी, आपको १५० लोगोंकी हत्या करने के बाद, कैसा महसूस हो रहा है ?" असे विचारून त्याची फुल मुलाखत घेऊन आला तरी मला आश्चर्य नाही वाटणार."

HC डोईफोडे – "माने, ज्या पद्धतीने हा खटला चाललाय ना , त्यावरून मला तर वाटतेय कि हा कसाब, ह्यातून बाहेर निघणार."

Constable माने – "काय सांगताय ?"

HC डोईफोडे – "अजून ४ वर्ष काय ह्या खटल्याचा निकाल लागत नाही, बघ. लागलाच तर परत सुप्रीम कोर्ट आहे. त्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज आहे. जिवंत राहायला खूप काही करायची गरज नाही कसाबला. नुसते “मी निर्दोष आहे, मी काही केले नाही” एवढे जपत राहिला तरी पुष्कळ झाले."

Constable माने – "हे बाकी खरं आहे तुमचे."

HC डोईफोडे – "मला एक भीती वाटतेय. काही तरी खटपटी करून त्याने सिद्ध केले कि मी भारतीयच आहे आणि चांगल्या वागणुकीबद्दल त्याला १२/१४ वर्षांनी जेलमधून सोडून दिले, तर लगेच ह्याला कोणतरी पार्टी निवडणुकीचे तिकीट नक्की देईल. हा एवढा हुशार आहे कि निवडून पण येईल आणि मग आपल्याला त्याला सलाम मारून म्हणावे लागेल......K(y)a साब !!"


- राजन महाजन
६ जानेवारी २०१०


टीप - कथेतील पात्रे काल्पनिक आहेत पण भावना एकदम खऱ्या आहेत.


Friday, January 1, 2010

YZ


YZ
भारतात राजकारण्यांना व तत्सम VIPs ना मिळणारी सुरक्षा हि X, Y, Z ani Z+ अशा गटांत विभागलेली आहे. कोणत्या सुपीक डोक्यातून हि गटांची नावे आली त्याला सलाम. “Yxx Zxxxx” लोकांसाठी YZ सुरक्षा.
जो जास्त YZ आहे त्याला Z+ आणि जो कमी त्याला X. या YZ ना नक्की भीती आहे तरी कसली ? आपल्या कर्मामुळे लोक आपल्याला मारून टाकतील याचीच बहुदा यांना भीती असणार. गांधीजीनी आपल्याला धोका आहे हे माहित असूनहि सुरक्षा नाकारली होती. सुरक्षाकवच हि आता प्रतिष्ठेची बाब झाली आहे. जुने नेते हे लोकनेते होते……सध्याचे सगळे राजकीय नेते आहेत. लोकांना आपला वाटावा असा नेताच नाही. "लोकांचे सगळे आपले" असे नेते आहेत.
२६/११ ची घटना झाल्यावर सुरक्षिततेमध्ये वाढ झाली, पण कुणाच्या ? मंत्रालायाबाहेरची सुरक्षा वाढली आणि राजकीय नेत्यांची शोभा करून घेण्याची आयती सोय झाली. रोज २/३ बॉम्ब प्रूफ , बुलेट प्रूफ गाड्या , फोर्से- १ commandos सकट मंत्रालायाबाहेर उभ्या रहातात. नेत्यांचे सुरक्षा कवच वाढले कि राज्याची आणि राष्ट्राची सुरक्षा कशी वाढते ? हा प्रश्नच आहे. कोणीहि उपट-सुंभ उभा राहतो आणि म्हणतो मला धमकीचे phone आले, द्या सुरक्षा. तुलाच कसे phone येतात ?, च्यायला ...... आम्हाला का नाही कधी कोणी धमकीचे phone करत. साल्यानो …तुम्ही कामेच सगळी उलट - सुलट, बेकायदेशीर करणार तर धमक्या नाहीतर काय फुले येणार तुमच्यासाठी ?? आपला जीव मोलाचा आणि सामान्य लोक मेले तर लोकसंख्या कमी होण्यास मदत होते अशी या YZ नेत्यांची समजूत आहे कि काय ? आमच्या पैश्यातून तुम्हाला संरक्षण आणि आम्ही किड्या-मुंगी सारखे मरायचे ?
समजा, एखाद्या YZ नेत्याला मारले …खून झाला त्याचा तर कोणाला वाईट वाटणार आहे ? कोण रडणार आहे त्याच्यासाठी ? ज्यांचे व्यावसायिक हितसंबंध त्याच्यात गुंतले आहेत आणि त्याच्या मरण्याने ज्याला व्यावसायिक नुकसान होणार आहे ते सोडून इतर सर्व सुटकेचाच निश्वास टाकतील. त्यांना सुरक्षा देणारे police सुद्धा......
YZ VIPs नि जर उलट -सुलट धंदे सोडले आणि लोकसेवा, देशसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले तर त्यांना कोणाहि पासून भीती राहणार नाही. त्यांच्या मागे - पुढे असलेले police आणि force हि अशा YZ गिरी पेक्षा अजून चांगल्या विधायक कामांसाठी वापरता येईल.
- राजेंद्रकुमार महाजन
१ जानेवारी २०१०