Monday, November 16, 2009

किल्ला घ्यायचाय …..

किल्ला घ्यायचाय …..


३५० वर्षांपूर्वी जर चक्रम संस्था अस्तित्वात असती तर नक्कीच साऱ्या चक्रमानी महाराजांच्या हाताखाली खुशीने काम केले असते . एक गोष्ट महाराजांनाही जमली नसती ती म्हणजे त्यांचे स्वभाव बदलणे . स्वभावाला औषध नसते . या चक्रमांवर जर महाराजांनी किल्ला घेण्याची जबाबदारी टाकली असती तर काय घडले असते ह्याची ही छोटीशी काल्पनिक झलक .या कल्पनेत असे गृहीत धरले आहे कि ३५० वर्षांपूर्वी आजच्या सोयी उपलब्ध होत्या .

किंबहुना, आज महाराज असते तर .........असेही थोडेसे स्वरूप या लेखाला आहे .

महाराज – बऱ्याच दिवसांपासून हा रायगड मनात घर करून आहे, हा किल्ला आपल्याकडे हवा अशी इच्छा आहे.

बाळासाहेब (रवी परांजपे ) – बस, एवढेच ! मग आधी तरी सांगायचे. आणि एकच किल्ला, काय महाराज ? ठीक आहे. किती पैसे लागतील ते बोला, मी जमा करतो. लढायचे वगैरे बाकीचे लोक बघून घेतील. एकच विनंती की काम फत्ते झाल्यावर, भाषण मी करणार.

महाराज – किरण , आपला काय विचार आहे ?

किरण – तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, महाराज. करू ……काहीतरी करू आपण . महाराज …….किल्ला आत्ता लगेच घ्यायची इच्छा आहे का आपली ? नाही, ६ महिन्यानंतर नाही चालणार का ? ६ महिन्यानंतर आपल्या FD mature होतायत म्हणजे युद्द्धाच्या खर्चासाठी त्या FDs लगेच मोडायला नकोत. आणि अजून एक गोष्ट, आपले बाळासाहेबच दर वेळी पैसे जमा करण्यात पुढे असतात, किमान एकदा त्यांना ह्या जबाबदारीपासून दूर ठेवावे .

महाराज – ठीक आहे, विचार करू यावर. माधवजी तुमचे काय म्हणणे आहे ?

माधव (फडके), बाकीच्यांना उद्देशून – बोला ……कोण जबाबदारी घेतय ? कोणी तरी तरुण आणि नवीन माणसाने जबाबदारी घ्या. मी बऱ्याच वेळा किल्ले घेण्यामध्ये होतो, आता तुम्ही पण शिकायला पाहिजे. महाराज, तुम्ही चार दिवस आधी बोलला असतात तर मीच जबाबदारी घेतली असती पण आता पुढचे काही दिवस मी जाम busy आहे, शेतावर खूप काम आहे. तरीही, जो कोणी जबाबदारी घेईल त्याच्याकडे follow-up करायचे काम माझे. जर काही तलवारी वगैरे कमी पडत असतील तर मला सांगा, मी आश्विनभाईना फोन करून तलवारी किंवा निधीची सोय होईल का ते बघेन.

महाराज – विलासशेठ तुम्ही बोला, काही बोलायचे आहे का ? बऱ्याच वेळा हात वर केला होता तुम्ही.

विलास – नाही , तुम्ही म्हणताय ते योग्य आहे ……सगळेच जे म्हणाले ते बरोबर आहे . नाही... युद्धासाठी, पैसे जमा करण्यासाठी, तुम्ही म्हणाल त्या कामासाठी मी available आहे . युद्ध सामुग्रीचे काही काम असेल तर ते हि Equipment In-charge म्हणून मी करेन, तेवढा technical अनुभव आहे माझ्याकडे. एकच करा महाराज , आज कालची हि नवीन पोरे पण माझी टिंगल करतात, त्यांना एकदा चांगला दम द्या.

महाराज – शेठ , देतो मी दम.

महेश केंदुरकर – महाराज , मी बोलू का ? रायगड घ्यायचा असे काहीही आपले मागच्या AGM मध्ये ठरलेले नाही. युद्धासाठी आपण budget हि sanction करून घेतलेले नाही. जर हा असा खर्च करायचा असेल तर आधी general meeting घेऊन खर्चाला मान्यता घ्यावी लागेल. माझ्यामते ज्या नियमांना आणि घटनेला आपण सर्वांनी मान्यता दिली आहे तिच्या प्रमाणेच आपण वागावे . (मनातल्या मनात –जर असे केले नाहीत तर मी उद्या एक खरमरीत e-mail करेन आणि त्याची सर्वाना cc करीन.)

महाराज – तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे घटनाबाह्य आपण काहीही करणार नाही . (मनातल्या मनात – आणि जर केलेच तर तुम्ही मला E-mail या शस्त्राने नामोहरम कराल हे मला माहितीये ) शारंगराव , तुम्हाला काय वाटते ?

शारंग – (मनातल्या मनात – काय उद्योग नाही का दुसरा ?) मला विचारलेत म्हणून, स्पष्टच सांगतो कि आपल्याला ह्या किल्ल्याची सध्या काही गरज नाही . Already जे किल्ले घेऊन ठेवलेत ते आपण व्यवस्थित सांभाळूया , मग पुढे.

महाराज – ते तुमचे मत असेल, बहुमत नाही (आता महाराज पण थोडे चक्रमानप्रमाणे बोलू लागले ). आपण इतरांचे मत घेऊ . नितीनजी, तुमचे काय मत आहे ?

नितीन – (Laptop उघडून ) मी एक data sheet बनवली आहे . किल्ला घायचा असेल तर किती पैसे लागतील, किती सैन्य लागेल, किती युद्द्ध साहित्य लागेल, कुठल्या बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा, कोणत्या वेळी करावा इत्यादी सगळी माहिती मी जमा केली आहे. संपूर्ण logistics तयार आहे.

महाराज – बघू .

महाराज data sheet नजरेखालून घालतात आणि चिंताग्रस्त मुद्रेने म्हणतात – नितीनजी, तुम्ही ज्या किल्ल्याची माहिती गोळा केलीय, तो मागच्या वर्षीच आपण घेतला. तो किल्ला घेण्या अगोदर हि सर्व माहिती काढायचे आदेश तुम्हाला दिले होते. जाऊ दे , या वेळी वेळेत माहिती जमा करून आमच्याकडे पाठवा.

भाऊकडे पाहत - भाऊ, …..किल्ला घ्यायचाय आपल्याला .

भाऊ (गोगटे ) – तो तुमचा problem आहे. माझा आणि स्वराज्याचा काही संबंध नाही. तुमच तुम्ही काय ते बघून घ्या.

अनिकेत (पप्पू ) – महाराज, मी ! महाराज, मी ! ……. मला , मला संधी द्या एकदा.

महाराज – नको , please ….तुम्ही जबाबदाऱ्या घेता आणि नंतर तुम्हाला शोधायला माणसे धाडावी लागतात.

सुदीप , कार्यवाह , तुम्ही काहीतरी बोला ….

सुदीप – महाराज ……(महेशकडे हळूच एक नजर टाकत ) माझ्या हि डोक्यात exactly तुमच्यासारखाच विचार कित्येक दिवस चालू होता. मलाही हेच वाटत होते कि हा किल्ला आपल्याकडे हवा. फक्त तुम्ही बोललात आणि मी बोललो नाही. हा किल्ला घ्यावा असे माझेही मत आहे. पण महेश के म्हणाल्याप्रमाणे AGM मध्ये आपण काही ठरवले नसल्याने आपण तसे लगेच करू शकणार नाही. शारंगने म्हटल्याप्रमाणे आपल्याला हे पण तपासायला हवे कि आपल्याला या किल्ल्याची तत्काळ गरज आहे का ? किरण ने सांगितल्या प्रमाणे ६ महिन्यानंतर चालत असेल तर तेव्हा विचार करू.

महाराज – हि सगळी मते आम्ही ऐकली आहेत, तुमचे मत काय आहे ?

सुदीप – माझे मत ? (डोके खाजवून ) सांगितले ना मी ?

तेवढ्यात MB धावत -पळत दरबारात आले.

महाराज – महेशराव, आज उशीर झाला यायला ?

MB – महाराज , काही केल्या घरामध्ये तलवारच सापडत नव्हती . मग म्हटले, मरू देत. दुसरी तलवार विकत घेतली आणि आलो. मला कळले तुमची काय चर्चा चालू आहे ते, सुदीपचा sms आला. माझ्या मते आपण प्रतापगड घ्यायलाच हवा , मग काय वाट्टेल ते झाले तरी चालेल .

महाराज (कपाळावर हात मारून ) – महेशराव, प्रतापगड आपलाच आहे ……..चर्चा रायगडबद्दल चालू आहे. मागच्या वेळी हि तुम्ही जो किल्ला घ्यायला निघालात तिथे जाण्याऐवजी भलत्याच किल्ल्या जवळ जाऊन सैन्याची वाट पाहत बसलात. सैन्य एका किल्ल्याजवळ आणि तुम्ही दुसऱ्या किल्ल्याजवळ असे दोन दिवस गेले आणि एकमेकाची वाट पाहत दोघांना परतावे लागले.

MB – महाराज, कधीतरी अशी चूक होते. माफी मागतो.

महाराज – विनयजी, तुम्ही गप्प आहात बराचवेळ, बोला तुमच्या मनात काय आहे ?

विनय – (चेहऱ्यावरील भाव , दाढीमागे लपवत ) मी आशुशी बोलतो. माझी कशालाच काही हरकत नाही.

महाराज – OK. राजन, तुमचे काय मत ?

राजन – प्रथम , मला online account ओपन करून द्या …..मी कधी पासून सांगतोय कि आपल्या लोकांना जाम त्रास होतोय पैशाच्या उलाढाली करायला, तर माझे कोणी ऐकतच नाही. प्रत्येक वेळी मी हा मुद्दा उपस्थित करतो आणि त्या मुद्द्यावर काहीच ठोस कारवाई होत नाही. आता technology किती पुढे गेलीये आणि आपण अजून ढाल -तलवारी घेऊनच लढतोय…. आधी २५ बंदुकांची provision करा.

महाराज हताश होतात.

बर्वे आणि बापुमामा बोलण्याची परवानगी मागतात. महाराज परवानगी देतात.

बापुमामा – मी जे बोलणार आहे ते आमच्या दोघांच्या वतीने. आम्ही खूप वेळा सांगूनही गेल्या २ मोहिमांचे अहवाल आणि मोहिमांचा जमा -खर्च अजून आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही त्यामुळे आम्ही तो आपल्यासमोर सादर करू शकलेलो नाही . तरी यासंबंधी योग्य ती कारवाई लगेच करावी.

महाराज – सर्वांची मते ऐकून , मीच confuse झालोय . माझे काय मत होते , याचाच मला विसर पडलाय . आपण एक काम करूया, हि सभा तहकूब करून पुढील सभेमध्ये परत याच विषयावर चर्चा करून, योग्य तो निर्णय घेऊया.

अशा रितीने, सभा तहकूब होते.

- राजन महाजन

१६ नोव्हेंबर २००९

टीप - येथे कोणासही दुखावण्याचा हेतू नसून व्यक्तिरेखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला सांगण्यास आनंद आहे कि चक्रममध्ये अशा भिन्न विचारांच्या आणि मतांच्या व्यक्ती असून देखील, गेली २६ वर्षे संस्था कार्यरत आहे. संस्थेचा विस्तार होण्यामागे या भिन्न प्रकृतीच्या लोकांची एकत्र येऊन, एका ध्येयासाठी काम करण्याची वृत्तीच कारणीभूत आहे, हे नि:संशय. " यहाँ मतभेद है, मनभेद नहीं "

हि कल्पना पूर्णपणे माझी नाही . आशु आणि मला हि कल्पना मार्च महिन्यामध्ये रतनगडावर नेढ्यामध्ये बसलो असता सुचली.

15 comments:

  1. Ha ha ha... funny..... especially MB's response.... i still remember when we used to come together in his car for chakram meetings.
    He forgot to pick Apte Kaka once and we went back all the way from Chakram to Thane Fly-over

    ReplyDelete
  2. GOOOOOd !!!
    unless v fight v cant survive !
    Dahi Ghusal-lya shivay loni kase nighnaar?
    Tup tar Tya Nantar !!

    Pan DERA ani RAVI la ( pot and stirrer)Kay Farak
    our minds r like it. after butter is separated wash it down like our minds r clear.
    That the unity !
    Thats the Amalgamation !!
    That's the Strength !!!

    ReplyDelete
  3. Rajan: Perfect blend of Humor [and meanness :-)].

    Aniket: Are MB Chakram cha office kuthe ahe he visarla nahi te KHOOP ahe, nahi ka?

    Vinay: Good Poetry!

    ReplyDelete
  4. today also i roll out laughing remembering that conversation on Ratangad. Tremendous observation...:-)

    ReplyDelete
  5. hahahahahahhahahahahahahah.................solllliddd!!!!!! very funny!!! MB cha response sollid aahe.....pappu cha pan.....hahahhahaha.....keep it up rajan....u rock!!!!!!!

    ReplyDelete
  6. jabardast observation ahe yaaaar.....
    solid lihla ahes.....amazing......

    ReplyDelete
  7. Jabbardast....masta kalpana ahe ani creative ahe...MB cha responce laaaajawaaaab...!!!

    ReplyDelete
  8. Khoop haslo, rajan kamal kelis, may i add few chakrams in it, Lamba: Maharaj tumhi nusta hukum kara, konalahi jababdari dya, nahi jamle tar tyachaya hati BANGDYA bhara. BHAU POPAT : tumhi mhanal tase, aaj ghayacha tari me yain, TAMBU : tumhala tar mahayte me ekta javoon gheoon takto VAIBHAV(JADYA): mala ladhayla sangoo naka me saglyanchi khanya pinyachi wavavstha karto, MADHAVDADA; magchaya 2 mohimanche audited reports alya shivay navin mahim aakhoo naye

    ReplyDelete
  9. hahaha.... superb aahe...... mastach....

    ReplyDelete
  10. Mast vyaktirekha rekhatlya ahet... good job rajan :)

    ReplyDelete
  11. Rajanji, apratim!! ek 3 anki natak basel ya war.. :))

    ReplyDelete
  12. भन्नाटच! २००९ साली तु लिहीलेल अजूनही सेमच आहे रे राजनदादा!☺️

    ReplyDelete