Thursday, July 1, 2010

थोतांड


बरेच दिवस हा विषय डोक्यात घोळत होता, लिहायला मुहूर्त सापडत नव्हता. पुन्हा एक वीडियो टीवीवर पहिला आणि आता लिहील्याशिवाय राहावत नाहीये.

त्यात दाखवले होते - रायबरेली येथे एक बाबा लहान मुलांचे रोग बरे करण्यासाठी येणार्‍या लोकाना मुलांना गटरच्या पाण्यात आंघोळ घालण्याचा सल्ला देत होता आणि लोक त्यांच्या वर्षा - दोन वर्षांच्या मुलांना त्या पाण्यात नखशिखांत न्हाऊ घालत होती. मुले ओरडत, रडत होती पण अंधश्रद्द आई-वडिलांना कसलेही भान नव्हते. त्या मुलांच्या आरोग्याला हानिकारक गोष्ट आपण करत आहोत याची जाणीव त्याना नव्हती. या पाण्यामुळे त्याना बरे करण्याऐवजी भयंकर किटाणूंच्या स्वाधीन करत आहोत हे त्यांच्या गावीही नव्हते. त्या बाबापेक्षा मला या लोकांचा जास्त राग आला. स्वत:हून खड्ड्यात जाण्यासारखे होते हे. अडाणी लोकच हे करू शकतात असे मात्र नाही. चांगले शिकले-सवरलेले लोकही अशा बाबांच्या जाळ्यात अडकतात.
बर्‍याच बाबांच्या लीला वेळोवेळी उघडकीस आल्या आहेत. कित्येक बाबांवर गंभीर आरोप झालेले आहेत, कित्येकानी तुरुंगाची हवा खाल्लेली आहे. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे स्वामी नित्यानंद. यांच्या काम क्रिडानचे वीडियो यू-ट्यूब वर उपलब्ध आहेत. स्वामीबद्दल बरेच छापुन आलेय, टीवीवरही बरेच दाखवण्यात आलेय. नुकतीच त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मग त्यानी पश्चात्तापाचे नाटक केले.

काही महिन्यांपुर्वी "इच्छाधारी संत स्वामी भीमनंद्जी महाराज चित्रकूटवाले" अशा लांबलचक नावाच्या बाबाचा पर्दाफाश झाला. बाबा वेश्या पुरविण्याचे काम करायचे असे उघडकीस आले. बर्‍याच शहरात त्याचे जाळे पसरले होते. त्यातून त्याने ५०० कोटीची माया जमवल्याचा आरोप आहे. या लिंक पहा -

आसारामबापु हे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या आश्रमात एका महिन्यात ४ मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण होऊन ते गोत्यात आले. अजूनही काही प्रकरणांमधे ते अडकले आहेत. काही जमीन बळकावल्याच्या केसेस आहेत, काही फसवणुकीच्या. http://www.indianexpress.com/news/cult-&-controversy-the-story-of-asaram-ashr/347163/ मध्यंतरी तर त्यांनी पोलिसाना आव्हान दिले की हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा.

सत्य साईबाबा ह्यांचे अनेक राजकीय नेते, उद्योजक, तारे-तारका भक्त आहेत. पण तेही वादांपासून दूर राहू शकलेले नाहीत. त्यांचे चमत्कार हे कोणीही साधारण जादुगार करू शकतो असे जादुगारांचे म्हणणे आहे. अलाहाबाद येथील प्रा. नायर यानी सत्य साईबाबाना आव्हान दिले आहे की तुमचे सारे चमत्कार मी करू शकतो...तुम्ही खरच बाबा असाल, तुमच्या मधे दैवी शक्ति असेल तर मी सांगतो ते करून दाखवा. यू-ट्यूब वरदेखील
http://www.youtube.com/watch?v=hWomaejpSkg बाबांचे चमत्कार हे निव्वळ हातचलाखी आहे हे दर्शवणारे असंख्य वीडियो आहेत. तसेच त्यांच्यावर आरोप करणारे, त्यांच्या विरोधात बरेचसे लिहिले गेले आहे. हे दोन ब्लॉग्स मला सापडले. http://saibabaexposed.blogspot.com/2002/07/sai-baba-shiva-or-sadhaka.html , http://exposedsaibaba.blogspot.com/2009/05/expose-of-fraud.html

बंगलोरच्या जवळ सत्य साईबाबा सारखा दिसणारा सिव साई बाबा आहे. हा बाबा कमी आणि गारुडी जास्त वाटतो. याचे सापाबरोबरचे वाहयात चाळे पहा. http://www.youtube.com/watch?v=cmeY6likhOs

श्री श्री रवि शंकर यांच्या आश्रमात काय गोंधळ झाला....बाबांचे म्हणणे की मला मारण्यासाठी गोळीबार झाला पण अध्यात्माचे कवच आश्रामाभोवती असल्याने कोणालाच काहीही इजा पोहचली नाही. तपासात असे निश्पन्न झाले की कुत्री हकलण्यासाठी केलेला तो गोळीबार होता. केवढा मोठा पोपट झाला.

थप्पड़ बाबाचा हा वीडियो पाहाच. http://www.youtube.com/watch?v=aGag2lZlKlM असे वाटते की जीव घ्यावा ह्याचा. हा बाबा १५/१६ वर्षाचा आहे. लहान मुलांच्या अंगावर काय उभा राहतो, त्याना उचलून फेकून देतो, मारतो. त्यांच्यावर उपचार करण्याच्या नावाखाली काय वाट्टेल तो गोंधळ घालतो. याची उपचार पद्धती हिंसकच आहे. छातित लाथ मारणे, पाठीत लाथ मारणे, मान मुरगळणे, हात मुरगळणे.

ठोककुडू बाबा, बोलेन बाबा, पाइलट बाबा, कमलीवाले बाबा,कर्नालचा पानीवाला बाबा अश्या बर्‍याच बाबांचे प्रताप internet वर उपलब्ध आहेत. टीवीवर सुद्धा यांचे फसवणुकीचे प्रकार सतत दाखवत असतात. तरीही लोकांचे डोळे उघडत नाहीत, (की ते मुद्दाम डोळेझाक करतात).

बाबांचे पीक येतच राहते आणि त्याना भक्तगण मिळताच रहातात. बाबा होणे हा सध्याचा सर्वात किफायतशीर धंदा झालेला आहे. अशा बाबा, बापू, भगवान, महाराज, अवतार, अम्मा, माता ई. लोकांच्या मागे लागण्याची गरज का निर्माण होत असेल ? हा प्रश्न मला सारखा भेडसावत राहतो.

- राजन महाजन
२ जुलै २०१०


2 comments:

  1. good.. Jwalanta vishayala haat ghatlas... aaplyakadchi loka ati shraddhalu aani papabhiru astat... Karmakandane aani manrane sarva prashna mitatat ase tyana vatte.. educated loka suddha yat mage nahit..
    You could have mentioned abt Pharshi baba also from nashik.. dokyavar pharshi theun to rog bara karto ( as he claims, no personal experience :) ) tyachyavar rape chi allegations aahet..

    ReplyDelete
  2. Nice article, lots of babas in india but people still are into such things, shame on the people. Even educated people fall prey to such baba's.

    ReplyDelete